रोहित शर्मा एकटाच नडला वेस्ट इंडिज ला आणि शेवटी कार्तिक ने ठोकले..!

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात फलंदाजी करताना भारतीय संघाने 6 गडी गमावून 190 धावा केल्या. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने अर्धशतक झळकावले. दुसरीकडे, दिनेश कार्तिकने शेवटच्या क्षणी अंतिम टच देऊन डावाला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली.

रोहित शर्मासोबत सूर्यकुमार यादव सलामीला आला. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 44 धावा जोडल्या. दरम्यान, यादवने 16 चेंडूत 24 धावा केल्या. त्याच्यानंतर श्रेयस अय्यरही खाते न उघडताच बाद झाला. रोहित शर्मा एका टोकाकडून फलंदाजी करत होता. पंत 14 आणि पंड्या 1 धावा करूनपॅव्हेलियन ला परतले. रोहित शर्माने तुफानी फलंदाजी करताना अर्धशतक झळकावले आणि 44 चेंडूत 64 धावा केल्यानंतर तो बाद झाला. त्यांच्यानंतर दिनेश कार्तिकने फिनिशिंग टच देण्याचे काम केले. त्याने 19 चेंडूत नाबाद 41 धावा केल्या. अश्विनने नाबाद 13 धावा केल्या. अशा प्रकारे टीम इंडियाची धावसंख्या 6 विकेट्सवर 190 धावांपर्यंत पोहोचली. विंडीजकडून अल्झारी जोसेफने 2 बळी घेतले.

;

View this post on Instagram

A post shared by Team India (@indiancricketteam)

आम्ही तुम्हा सांगू इच्छितो कि आता भारत खूप चांगल्या परिस्थिती आहे. त्यामुळे आपण हा सामना जिंकू अशी अपेक्षा आहे. पण हा खेळ आहे यात कधी काय होऊ शकते आपण सांगू शकत नाही. वेस्ट इंडिज हा अन्होनी ला होनी करणारा देश आहे कधी पण सामन्याचे परिणाम बदलू शकतो.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप