एमएस धोनीच्या स्टाईलमध्ये षटकार मारून दिनेश बानाने जिंकावला अंडर-१९ वर्ल्ड कप, पाहा व्हिडिओ..!

भारताने पाचव्यांदा अंडर-१९ विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले असून, शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा चार गडी राखून पराभव केला होता. यापूर्वी टीम इंडियाने २०००, २००८, २०१२ आणि २०१८ मध्ये वर्ल्ड कप जिंकला आहे. त्याचवेळी २००६, २०१६ आणि २०२० मध्ये भारतीय संघाला अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता.

विजयी षटकार पुन्हा एकदा यष्टिरक्षक फलंदाजाच्या बॅटने आला आहे, अंतिम सामन्यात दिनेश बानाने माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या शैलीत षटकार मारून सामना संपवला होता. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा डाव ४४.५ षटकांत सर्वबाद १८९ धावांत आटोपला होता. जेम्स रियूने सर्वाधिक ९५ धावा केल्या होत्या. त्याचवेळी भारताकडून राज बावाने पाच आणि रवी कुमारने चार बळी घेतले होते.

टीम इंडियाने हे लक्ष्य ४७.४ षटकात सहा विकेट गमावून पूर्ण केले होते, भारताकडून निशांत सिंधू ५० धावांवर नाबाद राहिला होता. त्याचवेळी शेख रशीदनेही ५० धावांची खेळी केली होती. भारतीय संघ विक्रमी आठव्यांदा अंतिम फेरीत पोहोचला होता, अंडर-१९ मधील कोणताही संघ इतक्या वेळा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचलेला नाही. त्याचवेळी टीम इंडियाचा हा सलग चौथा फाइनल सामना होता. भारतीय संघाच्या नावावर सर्वाधिक पाच विश्वचषक जिंकण्याचा विक्रम जमा झाला आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने तीन वेळा विजेतेपद पटकावले आहे. यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये होता. या संघाने ग्रुप स्टेजपासून आतापर्यंत स्पर्धेतील आपले सर्व सामने जिंकले आहेत.

१९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांच्या विशेष यादीत यश धुल देखील सामील झाला आहे. त्याच्या आधी भारताने मोहम्मद कैफ (२०००), विराट कोहली (२००८), उन्मुक्त चंद (२०१२) आणि पृथ्वी शॉ (२०१८) यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला होता. याशिवाय रविकांत शुक्ला (२००६), इशान किशन (२०१६) आणि प्रियम गर्ग (२०२०) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अंतिम फेरीत पराभूत झाला होता.

आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर भारत आणि इंग्लंडच्या अंडर-१९ संघांमधील हा ५० वा सामना होता. यातील ३७ सामने भारताने तर ११ सामने इंग्लंडने जिंकले आहेत. अंडर-१९ वर्ल्डकप मध्ये भारताचा इंग्लंडविरुद्धचा रेकॉर्डही उत्कृष्ट राहिला आहे. वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघांमध्ये नऊ सामने झाले आहेत. यातील सात भारताने तर दोन इंग्लंडने जिंकले आहेत.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप