विंडीज गोलंदाजांवर दिनेश कार्तिक पडला तुटून, रोहित नंतर विंडीज ला लावला चोप मार..!!

शुक्रवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक पुन्हा एकदा स्फोटक शैलीत दिसला. ब्रायन लारा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात त्याने आपल्या स्फोटक खेळीद्वारे भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आणि या खेळीदरम्यान दिनेश कार्तिकने २ षटकार आणि ४ चौकारही लगावले.

वेस्ट इंडिजविरुद्ध भारताने धमाकेदार सुरुवात केली, पण सलामीचा फलंदाज सूर्यकुमार यादव जास्त काळ खेळू शकला नाही. पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर एकीकडे कर्णधार रोहित शर्मा आपल्या जुन्या शैलीत गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत होता, तर दुसरीकडे मधल्या फळीतील फलंदाज खेळू शकले नाहीत. श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या या तिघांनीही आपल्या फलंदाजीने निराश केले. त्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने भारतीय डावाला पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने अवघ्या १९ चेंडूत ४१ धावांची नाबाद खेळी खेळली, ज्यामुळे भारताने विंडीज  १९१ धावांचे लक्ष्य ठेवले.

View this post on Instagram

A post shared by Dinesh Karthik (@dk00019)


टीम इंडियाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक आयपीएल २०२२ पासून त्याच्या स्फोटक शैलीत दिसत आहे. त्याची कामगिरी पाहून त्यालाही बऱ्याच कालावधीनंतर टीम इंडियात परतण्याची संधी मिळाली. मात्र, यादरम्यान अनेक मालिकांसाठीही त्याचा समावेश करण्यात आला आणि त्याने या संधीचाही चांगला फायदा घेतला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये त्याने एक छोटी पण धडाकेबाज खेळी खेळून पुन्हा एकदा निवडकर्त्यांचा आणि कर्णधाराचा विश्वास जिंकला. या काळात त्याचे अर्धशतक हुकले असले तरी त्याच्या खेळीने भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना जिंकण्यासोबतच भारताने या मालिकेत१ -०  अशी आघाडीही घेतली आहे. रोहित शर्मा आणि दिनेश शर्मा यांच्या स्फोटक फलंदाजीमुळे भारताने यजमानांना १९१ धावांपर्यंत मजल मारता आली. पाहुण्या संघाच्या या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या१२२  धावांवर आटोपला. दिनेश कार्तिकला त्याच्या फलंदाजीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप