भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर खेळला गेला, जिथे टीम इंडियाने हा सामना ४ गडी राखून जिंकला आणि मालिकेत २-० अशी आघाडी घेतली तसेच मालिका देखील काबीज केली. या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ पूर्ण 50 षटकेही खेळू शकला नाही आणि 39.4 षटकांत 215 धावांत आटोपला.
View this post on Instagram
नुवानिडू फर्नांडोचे भारताविरुद्ध अर्धशतक: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नुवानिडू फर्नांडोने श्रीलंकेसाठी पदार्पण केले आणि त्याच्या पदार्पणाच्या सामन्यातच दमदार अर्धशतक झळकावले. त्याने 63 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 50 धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय एकाही फलंदाजाला ५० धावांची खेळी खेळता आली नाही. श्रीलंकेकडून कुशल मेंडिसने 34, हसरंगाने 21 तर दुनिथने 32 धावांची खेळी केली. याशिवाय सर्व फलंदाज भारतीय गोलंदाजांना बळी पडले. भारताकडून या सामन्यात मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी चांगली गोलंदाजी केली. दोन्ही गोलंदाजांनी ३-३ विकेट घेतल्या. त्याच्याशिवाय उमरान मलिकला 2 तर अक्षर पटेलला 1 बळी मिळाला.
केएल राहुलचे श्रीलंकेविरुद्ध अर्धशतक: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेच्या संघाला 215 धावांत गुंडाळल्यानंतर, टीम इंडिया जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरली, तेव्हा सुरुवात खूपच खराब झाली. सलामीवीर रोहित शर्मा (17) आणि शुभमन गिल (21) स्वस्तात बाद झाले. यानंतर सर्वांच्या नजरा माजी कर्णधार विराट कोहलीकडे लागल्या होत्या मात्र तो केवळ 4 धावा करू शकला आणि क्लीन बोल्ड होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याची विकेट लाहिरू कुमाराने घेतली.
View this post on Instagram
आघाडीचे 3 फलंदाज बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि हार्दिक पंड्याने भारतीय डाव सांभाळला. या सामन्यात हार्दिकने 53 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 36 धावा केल्या. त्याचवेळी केएल राहुलने या सामन्यात अर्धशतक झळकावले. केएल राहुलचे शहाणपण : विशेष म्हणजे या सामन्यात केएल राहुलच्या शहाणपणामुळे टीम इंडियाने विजय मिळवला. राहुल फलंदाजीसाठी क्रिजवर आला तेव्हा आघाडीचे ३ फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते, त्यानंतर त्याने हार्दिक पांड्यासोबत भारताचा डाव सांभाळला. त्याने संयमी फलंदाजी केली. मोठे फटके मारण्यापासून स्वतःला रोखले कारण रोहित-गिल हीच चूक करत होते. अशा स्थितीत राहुलमुळेच भारताने दुसरी वनडे जिंकली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.