भारतीय संघात अशा अनेक जोड्या आहेत, ज्या नेहमीच चर्चेत असतात. त्यापैकी एक विराट आणि अनुष्का हे सर्वात आवडते आणि चर्चेत असलेले जोडपे आहे. हे कपल त्यांच्या लग्झरी लाइफसाठी अनेकदा चर्चेत असते. जर आपण त्यांच्या कमाईबद्दल बोललो तर हे दोन्ही लोक कमाई करण्यातही आघाडीवर आहेत. त्यांची लोकप्रियता आज इतर कपल पेक्ष्या जास्त आहे. म्हणूनच त्यांना पॉवर कपल असेही म्हणतात. एकीकडे विराट कोहलीने क्रिकेट विश्वात स्वत:ला गगनाला भिडवले असताना, अनुष्का शर्माने बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला आहे,आणि आज दोघेही आपल्या मुलीसोबत आनंदाने राहत आहेत.
View this post on Instagram
पण, तुम्हाला माहित आहे का? की या दोघांच्या लग्नाआधी एका मुलीने विराटला सर्वांसमोर प्रपोज केले होते आणि त्यावेळी विराटने काय उत्तर दिले होते, आज आम्ही तुम्हाला त्या मुली बद्दल सांगणार आहोत जिच्या मुळे विराट चांगलाच चर्चेत आला होता. मित्रांनो, एकेकाळी असं म्हटलं जात होतं की विराट कोहली आणि ही महिला खेळाडूं या दोघांची चर्चा खूप होत्या.
रिपोर्ट्सनुसार, ही महिला खेळाडू इंग्लंड महिला क्रिकेट डॅनियल व्याट असल्याचे कळले, आणि असे म्हटले जाते की डॅनियल विराटला खूप पसंत करत होती आणि ती विराट कोहली ची खूप मोठी फॅन होती. एवढेच नाही तर २०१४ साली डॅनियलने विराटला लग्नासाठी प्रपोजही केले होते. मात्र, त्यावेळी विराटचे लग्नही झाले नव्हते आणि त्या दिवसात डॅनियल प्रपोज करतानाचा एक व्हिडिओ समोर आला होता, जो खूप चर्चेत होता.
View this post on Instagram
यादरम्यान दोघांचे नाते केवळ हेडलाइन्समध्येच दिसले असले तरी प्रत्यक्षात दोघेही एकमेकांना भेटलेच नाहीत आणि नंतर जेव्हा विराट आणि अनुष्काने एकमेकांशी लग्न केले तेव्हा डॅनियलनेही त्यांना लग्नासाठी शुभेच्छा दिल्या, पण त्यावेळी डॅनियलने हे सर्व केवळ आपली लोकप्रियता वाढवण्यासाठी केल्याचे बोलले जात होते.
आजच्या काळात क्रिकेट हे मनोरंजनाचे सर्वोत्तम साधन बनले आहे. यातील प्रत्येक मॅच खूपच प्रेक्षणीय ठरते आणि काही काळापूर्वी या खेळात फक्त मुलांचीच आवड होती, मात्र आता तीच आवड मुलींमध्येही पाहायला मिळत आहे. त्यामुळे क्रिकेट पुरुष क्रिकेटसोबतच महिला क्रिकेटकडेही आता तितकेच लक्ष लागले आहे. आम्ही तुम्हाला हे सर्व सांगत आहोत कारण आयपीएलच्या पहिल्या प्ले-ऑफ क्वालिफायर फेरीपूर्वी महिला टी-20 मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत अनेक महिला क्रिकेटपटू भाग घेणार आहेत. तसेच भारतीय संघाच्या दोन महान खेळाडू स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर या दोन्ही संघांचे नेतृत्व करणार आहेत.