भारताविरुद्ध झालेल्या थरारक सामन्यात पराभावानंतर निकोलस पूरन ने दिली पहिली मोठी प्रतिक्रिया..!

वेस्ट इंडिज आणि भारत  यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना क्वीन्स पार्क ओव्हल येथे खेळला गेला, जिथे टीम इंडियाने हा सामना ३ धावांनी जिंकून मालिकेत१-० अशी आघाडी घेतली. वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार निकोलस पूरन भारताच्या जवळच्या पराभवामुळे खूपच निराश दिसत होता. त्यांनतर वेस्ट इंडिज चा कर्णधार निकोलस पूरन ने प्रतिक्रिया दिलेली आहे.

भारताच्या जवळच्या पराभवावर, वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार निकोलस पूरन म्हणाला की, हा पराभव एक प्रकारे विजयच वाटतो. गोलंदाजांना श्रेय देतो कारण आव्हान हे येतच राहील  परंतु सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. “आमच्यासाठी हे विजयासारखे वाटते.  आम्ही ५० षटकांची फलंदाजी करण्याबद्दल बोलत राहिलो आणि आम्ही काय सक्षम आहोत हे सर्वांनी पाहिले आणि आशा आहे की आम्ही येथून ताकदीकडे जाऊ शकू. उर्वरित सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहे.”

View this post on Instagram

A post shared by NickyP (@nicholaspooran)

“तो चांगला बॅटिंग ट्रॅक होता आणि आमच्या गोलंदाजांनी त्यांना रोखण्याचे कौतुकास्पद काम केले. आम्ही गोलंदाजांना श्रेय देऊ शकतो की आम्ही शेवटी चांगली गोलंदाजी केली आणि भारताला फार मोठी धावसंख्या होऊ दिली नाही. याचे श्रेय अल्झारी जोसेफ आणि इतर गोलंदाजांना जाते. पराभव स्वीकारणे कठीण आहे पण सत्याचा सामना करू. “आपल्याला एकमेकांवर विश्वास ठेवण्याची गरज आहे आणि मी प्रत्येकाला सांगत असतो की आपल्यासमोर आव्हाने असतील, परंतु सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. मला आशा आहे की आमचा संघ योग्य मार्गावर जात आहे.”

या सामन्यात कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना शिखर धवनच्या शानदार ९७ , शुभमन गिलच्या ६४ धावा आणि श्रेयस अय्यरच्या ५४ धावांच्या जोरावर टीम इंडियाने ५० षटकात ७ गडी गमावून ३०८ धावा केल्या. धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात काईल मायर्स, शर्मन ब्रूक्स आणि ब्रेंडन किंग यांच्या अर्धशतकांच्या जोरावर वेस्ट इंडिज संघाने ५० षटकांत ६ गडी गमावून ३०५ धावा केल्या.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप