दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत ऋषभ पंतकडे टीम इंडियाची कमान सोपवण्यात आली आहे. या मालिकेत दोन्ही संघ प्रत्येकी दोन गुणांनी बरोबरीत आहेत. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्या मध्ये भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते, मात्र नंतरचे दोन सामने जिंकून भारतीय संघाने शानदार पुनरागमन केले आहे.
त्याचबरोबर या मालिकेतील ऋषभ पंतची कामगिरी चिंताजनक आहे. मालिकेतील चार सामन्यात पंतला केवळ ५७ धावा करता आल्या आहेत. दक्षिण आफ्रिके विरुद्ध तो सातत्याने वाईड बॉल्स वर विकेट गमावत आहे. अशा स्थितीत पंतची खराब फलंदाजी टीम इंडिया साठी चिंतेचे कारण बनले आहे. त्याच बरोबर या मालिके नंतर भारताला जवळपास १५ सामने खेळायचे आहेत. अशा परिस्थितीत ऋषभ पंतला टीम इंडियातून डिस्चार्ज केल्यास त्याच्या जागी या दोन खेळाडूंना संधी मिळू शकते.
दिनेश कार्तिक
तीन वर्षांच्या कालावधी नंतर दिनेश कार्तिक ने टीम इंडिया मध्ये जबरदस्त पुनरागमन केले आहे. कार्तिकने आयपीएल २०२२ मध्ये आपल्या फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली होती, तेव्हा पासून त्याला टीम इंडिया मध्ये समाविष्ट करण्याची मागणी होत होती. दक्षिण आफ्रिके विरुद्ध च्या T-२० मालिकेत निवडकर्त्यांनी कार्तिकला संधी दिली होती. या संधीचा फायदा घेत दिनेश कार्तिक ने आपल्या शानदार कामगिरीने टीम इंडियातील आपले स्थान पक्के केले आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्ध च्या चौथ्या टी-२० सामन्यात त्याने अवघ्या २७ चेंडूत ५५ धावांची धडाकेबाज खेळी करत आपला फॉर्म दाखवला आहे. कार्तिक अशीच कामगिरी करत राहिल्यास ऋषभ पंत ऐवजी तो टीम इंडियात यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून आपली भूमिका बजावू शकतो.
View this post on Instagram
ईशान किशन
दक्षिण आफ्रिके विरुद्ध इशान किशन चांगली फलंदाजी करत आहे. डावखुऱ्या फलंदाजाने मालिकेतील दोन सामन्या मध्ये अर्धशतके झळकावली आहेत. ईशान त्याच्या झटपट धावांसाठी ओळखला जातो. आयपीएल मधला हरवलेला फॉर्म परत मिळवण्याचा त्याने जबरदस्त प्रयत्न केला आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्धचा त्याचा धडाकेबाज फॉर्म आगामी T-२० विश्वचषका साठी टीम इंडिया मध्ये त्याचे स्थान निश्चित करण्याचा संदेश देत आहे. इशान किशनने १३ सामन्यात ३७.७५ च्या सरासरीने आणि १३२.४५ च्या स्ट्राइक रेटने चार अर्धशतकांसह ४५३ धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत टीम इंडियातून ऋषभ पंतला बाहेर केले तर त्याच्या जागी ईशानला आणखी एक संधी मिळू शकते.