अहमदाबाद मध्ये वेस्ट इंडिज बरोबर झालेल्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की एक संघ म्हणून आम्हाला चांगले आणि आजून चांगले व्हायचे आहे. संघाला जे हवे आहे ते साध्य करणे हे माझे अंतिम ध्येय आहे. भारताने वेस्ट इंडिजचा ६ विकेट्सने पराभव केला तरी रोहित शर्मा म्हणाला की खेळाडूंना स्वतःला आव्हान देण्याची गरज आहे.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की खेळाडूंना स्वतःला आव्हान देण्याची गरज आहे यामध्ये भारताने वेस्ट इंडिजचा ६ गडी राखून पराभव करत शानदार विजय मिळवला. सामना संपल्यानंतर रविवारी कर्णधार रोहितने आपल्या खेळाडूंना नवनवीन प्रयोग करण्यास सांगितले. हॅमस्ट्रिंगच्या ताणातून सावरल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या रोहितने५१ चेंडूत ६० धावा केल्या कारण भारताने १००० व्या वनडेत २८ षटकांत १७६ धावांचे सहज पाठलाग केले.
सामन्यानंतर रोहित म्हणाला, “एक संघ म्हणून आम्हाला चांगले आणि चांगले व्हायचे आहे. संघाला जे हवे आहे ते साध्य करणे हे आमचे अंतिम ध्येय आहे. जर संघाला आजून चांगली कामगिरी करायची असेल तर काहीतरी वेगळे केले पाहिजे. तो म्हणाला, “मी खेळाडूंना स्वतःला आव्हान देत राहण्यास सांगत आहे आणि काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा आणि वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून जेव्हा गरज पडेल तेव्हा खेळाडू त्यासाठी तयार होतील,”
रोहित म्हणाला, “माझा ‘परफेक्ट’ खेळावर विश्वास नाही कारण खेळामध्ये हार जीत होत असते त्यामुळे तुम्ही ‘परिपूर्ण’ होऊ शकत नाही. पण सगळ्यांनी छान काम केलं. आम्ही सर्व विभागांमध्ये चांगली कामगिरी केली. मला यात खूप आनंद झाला आहे. असं हि रोहित म्हणाला
संघाला वेगळे काय करता आले असते? असे विचारले असता ३४ वर्षीय रोहित म्हणाला, “फलंदाजी करताना, आम्ही पाठलाग करताना जास्त विकेट गमावू नयेत, ही पहिली गोष्ट आहे. कारण असे झाल्यास खालच्या ऑर्डरवर अधिक दबाव आला असता.” तो असेही म्हणाला, “मला त्याच्याकडून श्रेय काढून घ्यायचे नाही. आम्ही सुरुवातीला आणि नंतर शेवटी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, ती चांगली होती.
पण आम्हाला आणखी चांगली कामगिरी करायची आहे त्यामुळे मी या मॅच चे श्रेय खेळाडूंना न देता प्रशिक्षकांना देतो. कारण त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले, खूप लहान लहान गोष्टी आमच्या लक्ष्यात आणून दिल्या म्हणनूच आम्ही विजयास पात्र झालो असे तो म्हणाला.