आपण सर्वच आयपीएलचे चाहते आहोत आणि जेव्हा देशात आयपीएल सुरू होते, तेव्हा वेगळे काही विशेष उरत नाही. आयपीएल हा राष्ट्रीय स्तरावरील खेळ आहे जो दरवर्षी देशात आयोजित केला जातो. अनेक भारतीय खेळाडूंसोबतच अनेक परदेशी खेळाडूही आयपीएलमध्ये सहभागी होतात. कोरोनाच्या काळात बहुतांश खेळांचे सामने रद्द झाले होते, तेव्हाही लॉकडाऊनच्या मध्यावर यूएईमध्ये आयपीएल सामन्याचे आयोजन करण्यात आले होते आणि यावेळीही आयपीएलला लोकांचे भरभरून प्रेम मिळाले. या वर्षी सुद्धा IPL ला तेवढेच भरभरून प्रेम मिळत आहे कारण या वर्षी ८ नाहीत तर तब्बल १० संघ एकमेकांसमोर मैदानात उतरणार आहेत.
यातच आता भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी बुधवारी आयपीएल २०२२ मध्ये कोलकाता नाइट रायडर्स (KKR) कडून झालेल्या पराभवादरम्यान मुंबई इंडियन्स (MI) कर्णधार रोहित शर्माच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जसप्रीत बुमराहला डेथ ओव्हर्सच्या गोलंदाजीत ठेवावे, असे रवी शास्त्री म्हणाले.
स्टार स्पोर्ट्सवरील संभाषणात जसप्रीत रवी शास्त्री म्हणाले की मला वाटते की बुमराहचा वापर अधिक चांगला असावा. कधी कधी तुमच्या गोलंदाजीमध्ये सखोलता नसल्यामुळे तुम्हाला त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करता येत नाही. त्यामुळे विकेट शोधण्याऐवजी तुम्ही डेथ ओव्हर्ससाठी एक किंवा दोन खेळाडूंसाठीठेऊ शकता.
शास्त्री म्हणाले की, त्यावेळी तुम्ही बुमराह असो किंवा कोणीही, धावा कितीही होउदे याने काही फरक पडत नाही. जर फलंदाज त्या मूडमध्ये असेल आणि वेगवान मदत करत असेल तर तुम्ही धावांसाठी जाल. बुमराहला महत्त्वाच्या वेळी वापरायला हवे होते, असे शास्त्री म्हणाले. तुम्ही त्याला डावाच्या शेवटपर्यंत ठेवू शकत नाही. लवकर विकेट्स मिळवून विरोधी संघावर गंभीर दबाव आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पहिल्या सहा षटकांमध्ये खेळपट्टीत वेग आणि उसळी असेल तर किमान तीन बळी घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
विशेष म्हणजे मुंबई इंडियन्सच्या संघाला आतापर्यंत एकही सामना जिंकण्यात यश आलेले नाही. तिन्ही सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबईची अशी सुरुवात होईल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. KKR विरुद्धच्या सामन्यात मुंबई संघाला ५ विकेट्सनी पराभवाला सामोरे जावे लागले. केकेआरकडून पॅट कमिन्सने अवघ्या १५ चेंडूत नाबाद ५६ धावांची खेळी केली. अशी धडाकेबाज खेळी करून त्याने त्याच्या संघाला जिंकण्यात मोलाचा साथ दिला.