न्यूझीलंड मध्ये ४ मार्च पासून सुरू होणाऱ्या महिला एकदिवसीय विश्वचषका पूर्वी भारतीय संघाला मोठा ध’क्का बसला आहे. सराव सामन्यात भारतीय महिला संघाची सलामीवीर स्मृती मानधना हिच्या डोक्यात धो’कादायक बा’ऊन्सर लागला आणि तिला लगेचच मैदान सोडावे लागले होते. रविवारी (२७ फेब्रुवारी) दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या सराव सामन्या दरम्यान मंधानाला ही दु’खापत झाली होती.
सामन्याच्या सुरुवातीला शबनम इस्माईलच्या बाउन्सरने मंधानाला दु’खापत झाली होती, त्या नंतर तिला दु’खापतग्रस्त रिटायर हर्ट व्हावे लागले होते. ती फक्त १२ धावा करू शकली होती, बाऊन्सर लागल्या नंतर डॉक्टरांनी मानधनाची तपासणी केली आणि तिला फलंदाजी सुरू ठेवण्यासाठी तंदुरुस्त घोषित करण्यात आले होते. पण थोड्या वेळा नंतर बरे वाटत नसल्यामुळे ती मैदाना बाहेर गेली होती.
सामन्या बद्दल बोलायचे झाले तर दक्षिण आफ्रिकेची कर्णधार सून लूसने नाणे फेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी साठी आमंत्रित केले होते. दीप्ती शर्मा आणि कर्णधार मिताली राज हे दोन वरिष्ठ फलंदाज सामन्याच्या १० षटकांतच पॅव्हेलियन मध्ये परतल्याने भारताची सुरुवात चांगली झाली नाही. मात्र, यास्तिका भाटियाच्या ५८ धावांच्या खेळीने संघाला रोखून ठेवले होते. तिने आपल्या खेळीत चार चौकार आणि एक षटकार मारले होते.
#SmritiMandhana #CWC22@mandhana_smriti ‘stable’ after being hit on the head, under observation for mild soft tissue injury to left earlobe
Read: https://t.co/mv2NUkvENA pic.twitter.com/UeE7M2Frnx
— TOI Sports (@toisports) February 28, 2022
कर्णधार हरमन प्रीत कौरने या सामन्यात शानदार फलंदाजी करताना केवळ ११४ चेंडूत शानदार शतक झळकावले होते. भाटिया सोबत ८४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करताना या फलंदाजीने आपल्या डावात नऊ चौकार मारले होते. कॅप्टन लूसच्या चेंडूवर भाटियाची विकेट पडल्या नंतर कौरने भारता साठी खूप धावा केल्या होत्या. त्याच वेळी ऋचा घोष, स्नेह राणा आणि पूजा वस्त्राकर यांच्या सह इतर भारतीय फलंदाजांनीही काही महत्त्वाच्या खेळी खेळल्या होत्या.
टीम इंडियाने निर्धारित ५० षटकात ९ विकेट गमावून २४४ धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेसाठी, अयाबंगा खाका ही सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली कारण तिने सात षटकात केवळ २३ धावा देत तीन ब’ळी घेतले होते. इस्माईल, मसाबता क्लास, लुस आणि क्लो ट्रायॉनसह इतर गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट घेतली होती.