या ३ भारतीय क्रिकेटपटूची नावे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आहेत..!

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपले नाव नोंदवण्याची जगातील प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. असे असूनही खूप कमी लोक या यादीत स्थान मिळवतात. क्रिकेट विश्वात दररोज अनेक विक्रम मोडले जातात. असे अनेक विश्वविक्रमही केले गेले आहेत जे मोडणे अशक्य वाटते.  क्रिकेट बद्दल बोलायचे झाले तर, काही खेळाडू गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाले आहेत, अनेक खेळाडूंना त्यांच्या उत्कृष्ट कौशल्या मुळे आणि कधीही हार न मानणाऱ्या साहसी वृत्ती मुळे हा सन्मान मिळाला आहे. आज आपण तीन भारतीय खेळाडूं बद्दल बोलणार आहोत ज्यांची नावं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदली गेली आहेत.

विराग मारे: विराग मारे हा रस्त्यावर वडापाव विकून उदरनिर्वाह करत असे, पण याच दरम्यान त्याने क्रिकेट मध्ये करिअर करण्यासाठी मुंबईहून पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. या २४ वर्षीय तरुण खेळाडूने सर्वांना चकित केले आणि २४ डिसेंबर २०१५ रोजी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जास्त वेळ खाजगी सराव नेट सत्राचा विक्रम या तरुणाच्या नावावर आहे. मारेने ३ दिवस आणि २ रात्री फलंदाजी करून मागील विक्रम मोडला. २२ डिसेंबर रोजी कर्वेनगर येथील महालक्ष्मी मैदानावर मारेने नेट मध्ये पदार्पण केले होते. यादरम्यान त्याने २२४७ षटके खेळली आणि ५० तास पाच मिनिटे ५१ सेकंदात १४६८२ चेंडूंचा सामना केला. असे करताना विरागने डेव्ह न्यूमन आणि रिचर्ड वेल्सचा नेट सत्रात ४८ तासांचा फलंदाजीचा विक्रम मोडला.

एमएस धोनी: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात महेंद्रसिंग धोनीचे नाव मोठ्या अभिमानाने आणि आदराने घेतले जाते. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अभूतपूर्व यश मिळवले आहे. कर्णधार धोनीचे नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये देखील समाविष्ट असल्याचे फार कमी लोकांना माहिती आहे. भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने हा विक्रम त्याच्या रिबॉक बॅटमुळे (ज्याने २०११ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात षटकार मारून भारताला विश्वविजेता बनवले होते) हे रेकॉर्ड केले आहे. युनायटेड किंगडमच्या लंडन शहरात आयोजित “ईस्ट मीट्स वेस्ट” कार्यक्रमा दरम्यान धोनीची खास बॅट आरके ग्लोबल शेअर्सने १००००० युरो ($१६१२९५) मध्ये खरेदी केली होती. या निधीतून जमा झालेली रक्कम साक्षी फाऊंडेशन अंतर्गत वंचित गरीब मुलांच्या विकासा साठी आणि चांगल्या भविष्यासाठी वापरली गेली होती.

राजा महाराज सिंह: बॉम्बेचे (सध्याचे मुंबई) माजी गव्हर्नर राजा महाराज सिंहची क्रिकेटची आवड बऱ्याच काळानंतर जाणवली. नुकतेच त्याने त्याचे स्वप्न साकार केले. काठपुरा येथील राजघराण्यात जन्मलेल्या महाराज सिंहने वयाच्या ७२ वर्षे १९२ दिवसात प्रथम श्रेणीत पदार्पण करून आपले नाव इतिहासाच्या पानात नोंदवले. त्याचा पहिला सामना गव्हर्नर्स इलेव्हन आणि कॉमनवेल्थ इलेव्हन यांच्यात झाला. गव्हर्नर्स इलेव्हनचे नेतृत्व करणारा महाराज सिंग खेळाच्या पहिल्या दिवशी नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला, पण अवघ्या चार धावांवर बाद झाला. बाद झाल्या नंतर तो संपूर्ण सामन्या दरम्यान मैदानात परतला नाही.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप