IPL २०२२ ची ट्रॉफी जिंकणाऱ्या टीमला मिळणार ‘इतक्या’ कोटींचं बक्षीस तर उपविजेत्या टीमवर ही होणार पैशांची बरसात!

दरवर्षी आयपीएलचा हंगाम खेळला जातो आणि प्रत्येक वर्षी या खेळाच्या अखेरीस तो तितकाच रोमांचक होत असतो! शेवटच्या क्षणी आयपीएलची ट्रॉफी कोणता संघ जिंकणार याबद्दल क्रिकेटप्रेमी मध्ये प्रचंड उत्सुकता लागलेली असते, म्हणून अख्ख्या जगभरात आयपीएलचे सामने मोठ्या आवडीने क्रिकेट शौकिनांना कडून पाहण्यात येतात! आयपीएलचा हंगाम संपल्यानंतरही कित्येक महिने आयपीएल, त्यातील नवीन उदयास आलेले खेळाडू, त्यांची खेळी, आयपीएल ट्रॉफी जिंकणारी टीम, त्यांना मिळणारे पैसे या सर्व गोष्टींवर कित्येक महिने चर्चा रंगताना दिसते!

यंदाच्या आयपीएल मध्ये ही उत्कंठावर्धक असेच काहीसे वातावरण निर्माण झाले आहे कारण आयपीएल आता त्याच्या शेवटच्या सामन्यापर्यंत येऊन पोहोचल आहे. यंदा जरी रॉयल चॅलेंजर बंगळूरूच्या टीमला विजेतेपद जिंकता आलं नसलं तरीही या टीमवर जोरदार पैशांचा बरसात होणार आहे!

याचे मुख्य कारण म्हणजे, आयपीएलच्या यंदाच्या सिझनमध्ये आता फक्त एकच अखेरचा फायनल सामना उरला आहे. दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान टीमने बंगळूरूचा पराभव केला. यानंतर फायनलच्या सामन्यात आता गुजरात टायटन्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स या दोन दिगग्ज टीमच्या अतंर्गत लढत रंगणार आहे. आणि महत्वाचे म्हणजे यंदा रॉयल चॅलेंजर बंगळूरू आयपीएलची ट्रॉफी पटकावणार अशी चिन्हे दिसत असताना राजस्थानने चाहत्यांचं आणि बंगळूरूच्या टीमच्या खेळाडूंचं सगळं स्वप्न धुळीला मिळावत बढती मिळवली आहे!

मात्र यावेळी बंगळूरच्या टीमला जरी या हंगामात जेतेपद मिळवता आलं नसलं तरीही रॉयल चॅलेंजर बंगळूरूच्या टीमवर अमाप पैशांचा पाऊस पडणार आहे!

राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या पराभवानंतर बंगळूरूच्या टीमने पॉइंट्स टेबलमध्ये तिसरा क्रमांक गाठण्यात यश मिळवले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यंदाच्या आयपीएल सिझनसाठी आरसीबीच्या टीमला तब्बल ७ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल, तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या लखनऊ सुपर जायंट्स या टीमच्या खात्यात ६.५० कोटी रुपयांपर्यंतची रक्कम जमा होईल!

२९ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर आयपीएलच्या १५ व्या सिझनचा चुरशीचा सामना रंगताना दिसणार आहे. या सामन्यातील विजेत्या टीमला २० कोटी तर उपविजेत्या टीमला १३ कोटी रुपयांची रक्कम मिळणार आहे!

तर एकीकडे पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या खेळाडूंना प्रत्येकी १५ लाख रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाणार असल्याचे वृत्त समजते. तर दुसरीकडे, यंदाच्या सिझनचे उदयोन्मुख खेळाडू (इमेर्जिंग प्लेअरला) यांना २० लाख रुपयांचे बक्षीस जिंकण्याची संधी मिळणार आहे.

दरम्यान आयपीएलचा हा फायनल सामना रंगण्यापूर्वी मनोरंजनासाठी एका धडाकेबाज भन्नाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटीं वर्णी लावणार असल्याचे समजते. यावेळी बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंह आणि संगीतकार ए.आर. रहमान यांचा देखील या कार्यक्रमामध्ये समावेश असणार आहे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप