भारत आणि श्रीलंका यांच्यात धर्मशाला येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने श्रीलंकेचा ७ गडी राखून पराभव करत मालिका जिंकली होती. त्याचवेळी सामन्याच्या सुरुवातीलाच एका क्षणी भारत अडचणीत दिसत होता. पण त्यावेळी टीम इंडियाच्या एका खेळाडूने क्रीजवर येताच असे वा’दळ निर्माण केले की, टीमने तीन षटकांपूर्वीच सामना जिंकला. त्यानंतर संघाला युवराज सिंगपेक्षा धोकादायक आणि हार्ड हि’टर खेळाडू मिळाल्याचे मानले जात आहे. चला तुम्हाला या खेळाडू बद्दल सांगतो.
View this post on Instagram
खरे तर, धर्मशाला येथे नुकत्याच झालेल्या भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामना रंगत असताना रवींद्र जडेजाने क्रीजवर येताच असे वा’दळ निर्माण केले की टीम इंडियाने तीन ओव्हर पूर्वीच सामना जिंकला. दुखापती नंतर रवींद्र जडेजा टीम इंडियात परतला आहे. रवींद्र जडेजा च्या आगमना नंतर अडचणीत अडकलेला हा सामना पूर्णपणे एक तर्फी झाला. टीम इंडियाने टी-२० मालिका जिंकली. यासोबतच टीम इंडियाला दुसरा युवराज सिंग मिळाला आहे, जो आगामी टी-२० विश्वचषकात चमकदार कामगिरी करून ट्रॉफी जिंकू शकतो, असे बोलले जात आहे.
रवींद्र जडेजाने धर्मशाला येथे श्रीलंके विरुद्ध अवघ्या १८ चेंडूंत ४५ धावा केल्या आहेत, ज्यात ७ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. या काळात रवींद्र जडेजाचा स्ट्राईक रेट २५० होता, त्यामुळे त्याने श्रीलंके च्या गोलंदाजांना एकही संधी दिली नाही. गेल्या एक- दोन वर्षांत फलंदाज म्हणून रवींद्र जडेजा च्या कामगिरीत बरीच सुधारणा झाली आहे, त्यामुळे टीम इंडियाच्या त्याच्या कडून अपेक्षाही वाढल्या आहेत. यासोबतच टीम इंडियाच्या मॅच फिनिशरचा शोधही पूर्ण झाला आहे.
View this post on Instagram
वास्तविक रवींद्र जडेजा चांगल्या फॉर्म मध्ये आहे. नुकत्याच झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात संघात पुनरागमन करत त्याने मालिका जिंकण्यात मोठे योगदान दिले होते. ज्यानंतर असे बोलले जात आहे की ऑस्ट्रेलियात होणार्या टी-२० वर्ल्ड कप २०२२ मध्ये आठ महिन्यां नंतर टीम इंडियाला ट्रॉफी मिळू शकते, ज्या प्रकारे युवराज सिंगने २८ वर्षांनी २०११ च्या वर्ल्ड कप मध्ये भारताला चॅम्पियन बनवले होते.
कसोटी क्रिकेट असो, एकदिवसीय क्रिकेट असो, किंवा T-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट व IPL, रवींद्र जडेजाने टीम इंडिया आणि चेन्नई सुपर किंग्ज साठी स्वतःच्या ध’डाकेबाज फलंदाजीने अनेक सामने जिंकले आहेत. रवींद्र जडेजा केवळ फलंदाजीतच नाही तर गोलंदाजीतही कहर करत आहे. रवींद्र जडेजाने श्रीलंके विरुद्ध सुरू असलेल्या T-२० मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या T-२० मध्ये विकेट्स घेतल्या होत्या. विशेष बाब म्हणजे रवींद्र जडेजा आपला चार षटकांचा कोटा अतिशय जलद पूर्ण करतो, तसेच विकेट- टू- विकेट गोलंदाजी मुळे फलंदाजांना धावा करण्याची संधी कमी मिळते. त्याचवेळी कर्णधार रोहित म्हणाला होता की, आगामी विश्वचषकात रवींद्र जडेजा वरच्या फळीत फलंदाजी करताना दिसणार आहे.