रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला विश्वास आहे की विराट कोहली आगामी आयपीएल २०२२ हंगामात कर्णधारपदाच्या ओझ्याशिवाय आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यास सक्षम असेल. ३३ वर्षीय कोहलीने आयपीएल २०२१ दरम्यान RCB कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता आणि आगामी हंगामा साठी फाफ डू प्लेसिस ची नवीन कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कोहली गेल्या काही काळा पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये सर्वोत्तम कामगिरी करत नाही आणि त्याने भारताच्या टी-२० आणि कसोटी कर्णधारपदाचा ही राजीनामा दिला आहे. सर्व फॉरमॅट साठी एक कर्णधार धोरणा नुसार, निवड कर्त्यांनी रोहित शर्माला वनडे फॉरमॅट मध्ये पूर्णवेळ कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे.
उजव्या हाताच्या या खेळाडू ने गेल्या दशक भरात सर्व फॉरमॅट मध्ये खेळावर वर्चस्व गाजवले आहे आणि आगामी हंगामात बॅटने चांगली कामगिरी करण्याची आशा आहे. यादरम्यान, मॅक्सवेल ला असे वाटते की कोहली आता पूर्वी सारखा आक्रमक क्रिकेट पटू मैदाना वर योग्य उत्तर देत नाही आणि हे आश्चर्य कारक आहे.
View this post on Instagram
मॅक्सवेल आरसीबी च्या पॉडकास्ट वर म्हणाला, त्याला माहित आहे की त्याने कर्णधार पदाची जबाबदारी सोडली आहे जी मला वाटते की कदाचित त्याच्या साठी एक मोठे ओझे कमी झाले आहे. कदाचित काही काळ त्याच्या वर हे ओझे होते आणि आता तो त्यातून मुक्त झाला आहे, ही कदाचित विरोधी संघासाठी धोकादायक बातमी आहे.
कोहली ने आयपीएल च्या १४० सामन्या मध्ये कर्णधारपद भूषवले आहे, ज्या मध्ये आरसीबीने ६६ सामने जिंकले आहेत तर ७० सामने गमावले आहेत. विराट च्या नेतृत्वा खाली आरसीबी ने २०१५, २०२० आणि २०२१ मध्ये प्लेऑफ मध्ये पोहोचले होते. या भारतीय खेळाडूच्या नेतृत्वाखाली, २०१६ मध्ये आरसीबीची सर्वोत्तम कामगिरी झाली जेव्हा संघाला आयपीएलच्या इतिहासात तिसऱ्यांदा उपविजेते पदावर समाधान मानावे लागले होते. विराट कोहली ने आयपीएल मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा आणि शतके झळकावली आहेत. ३२ वर्षीय कोहलीने आयपीएल मध्ये कर्णधार म्हणून एकूण ४८७१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटने ५ शतके आणि ३५ अर्धशतके झळकावली आहेत तर त्याची फलंदाजीची सरासरी ४१.९९ आहे.