माजी सलामी वीर वीरेंद्र सेहवागने यंदाच्या ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T-२० विश्वचषका साठी भारतीय फलंदाजी क्रमवारीतील टॉप ३ ची निवड केली आहे. त्याने भारताचा माजी कर्णधार विराट कोहली च्या नावाचा समावेश केलेला नाही. सेहवागला वाटते की इशान किशनने रोहित शर्मा किंवा केएल राहुल सोबत डावाची सुरुवात करावी आणि यापैकी कोणताही अनुभवी फलंदाज ३ नंबर वर फलंदाजी करू शकतो. दक्षिण आफ्रिके विरुद्ध इशानने ज्या इराद्याने फलंदाजी केली ते पाहून सेहवाग प्रभावित झाला आहे. किशनने संपूर्ण मालिकेत भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या आणि त्याने अतिशय आक्रमक फलंदाजी केली होती.
सोनी नेटवर्कने आयोजित केलेल्या संवादा दरम्यान सेहवागने भारतासाठी डाव्या-उजव्या सलामीच्या संयोजनाचे महत्त्व स्पष्ट केले आहे. त्यावर तो म्हणाला T-२० मध्ये हार्ड हिटर्सचा विचार केल्यास भारताकडे पर्याय आहेत. ऑस्ट्रेलियातील विश्वचषक स्पर्धे साठी मी वैयक्तिकरित्या रोहित शर्मा, इशान किशन आणि केएल राहुल यांना पहिल्या तीन फलंदाजांची निवड करेन. रोहित शर्मा आणि इशान किशनचे उजवे आणि डाव्या हाताचे संयोजन किंवा त्या बाबतीत, इशान आणि केएल राहुल हे टी-२० वर्ल्डकप साठी खूपच मनोरंजक असू शकतात.
View this post on Instagram
वीरेंद्र सेहवागने भारताचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला जागतिक दर्जाच्या जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीसह दीर्घकाळ वेगवान गोलंदाजी विभागाची जबाबदारी देण्यासाठी पाठिंबा दिला आहे. उमरान मलिकने आयपीएल २०२२ मध्ये आपल्या वेगवान खेळाने सर्वांना आश्चर्यचकित केले होते व १४ सामन्या मध्ये २२ बळीही घेतले होते. त्याला अलीकडेच आयर्लंड विरुद्ध च्या पहिल्या टी-२० सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. सेहवागचा विश्वास आहे की मलिक हा भारता साठी सर्व फॉरमॅट मध्ये सामना विजेता ठरेल.
पुढे तो म्हणाला, जर एखादा वेगवान गोलंदाज असेल ज्याने मला खूप प्रभावित केले असेल तर तो दुसरा कोणी नसून उमरान मलिक आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या प्रमुख गोलंदाजां पैकी एक म्हणून तो निश्चितपणे भारताच्या योजनांचा एक भाग असावा. या आयपीएल ने आम्हाला अनेक आशादायी तरुण गोलंदाज दिले आहेत, पण उमरानचे कौशल्य आणि प्रतिभा त्याला भारतीय संघात तिन्ही फॉर मॅट मध्ये निश्चितच स्थान मिळवून देईल.